राष्ट्रीय श्रीराम सेना व सकल हिंदू समाज व अनेक हिंदु संघटना चे पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांचे व पोलिस प्रशासन कर्मचारांचे मानले आभार
शशांक चौधरी – अमरावती प्रतिनिधी बांगलादेश मधील पीडित हिंदूंच्या समर्थनार्थ दिनांक 25 ऑगस्ट रोजी विराट हिंदू मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चा दरम्यान पोलीस बंदोबस्त जबरदस्त होता. मोर्चा शांतपणे पार पडला. यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त गणेश शिंदे, गुन्हे शाखेचे अवचार व जाधव, सिटी कोतवाली चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांचे सर्वांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले व आभार मानले. यावेळी राष्ट्रीय श्रीराम सेना प्रदेश अध्यक्ष नमिता तिवारी, राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेश मुख्य महासचिव डॉ. कंवल पांडे, राष्ट्रीय श्रीराम सेना जिल्हा अध्यक्ष बरखा बोज्जे, जिल्हा सचिव सविता ठाकरे, जिल्हा सहसचिव प्रिया इंगोले, सोनु साहू, हेमंत मालवीय, महानगर प्रमुख पुजा जोशी, प्रदेश प्रवक्ता मिना पाठक, अलका सप्रे, शहर अध्यक्ष भारती गायकवाड, शहर उपाध्यक्ष अपर्णा सवई, शहर सचिव रोशनी प्रजापती, शहर सहसचिव वैशाली आरोकर, प्रभाग अध्यक्ष जोती राठोड, तालुका प्रमुख पल्लवी आगासे (सदस्य), रंजना पांडे, श्रद्धा गहलोद, हेमलता श्रीवास, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.